---Advertisement---

शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्यात? हवामान तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । राज्यात मान्सूनने यावर्षी वेळेआधीच आगमन केलं. राज्यातील काही ठिकाणी धोधो पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळाले. पण मान्सून जेवढ्या वेगात दाखल झाला पण आता तो मंदावला आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करावी की नाही? असा प्रश्न पडला आहे. याबाबतच कृषीतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मे महिन्यातच सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक पावसाची नोंद झाली आहे. खरीप हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे मशागत न करता ‘वाफसा’ आल्यानंतरच पेरणी करावी लागणार आहे. काळ्या, खोल जमिनीत पेरणीयोग्य वाफसा येण्यासाठी किमान 10 ते 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. परंतु यापुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार,सध्या अतिपाऊस झालेल्या भागात वाफसा येण्यासाठी 8-10 दिवस वाट पाहावी लागेल. चालू आठवड्यात पाऊस कायम असल्यास शेतकऱ्यांना अंदाज घ्यावा लागणार आहे.

शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्यात?
राज्यात या वर्षी मान्सून साधारणतः 11 दिवस आधी दाखल झाला आहे. त्यामुळं शेतीच्या हंगामाला सुरुवात लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. काही भागांत पावसाचे प्रमाण अधिक असून जमिनी सतत ओलसर राहिल्यामुळं पेरणीसाठी योग्य वापसा अद्याप निर्माण झालेला नाही.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, राज्यात साधारण 3 जून नंतर मान्सूनचा पहिला टप्पा किंवा स्पेल संपेल त्यानंतरच म्हणजे साधारण जूनच्या पहिल्या आठवडच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरूवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्न डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं कृषी विभागाने म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---