नाशिक लाईव्ह न्यूज । फेब्रुवारीपासूनच तापमानाचा पारा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशावर गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी फळ पिकांवर परिणाम होताना दिसत आहे. द्राक्ष फळांवर मोठ्या प्रमाणात सन बर्निंग होत आहे. याचा थेट फटका उत्पादनाला बसणार असून किमान २० टक्के फळं खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
नाशिक सह सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात असते. यंदा देखील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. सध्या फळ परिपक्व होऊन काही दिवसांची तोडणी केली जाईल. मात्र मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली असून याचा फटका द्राक्ष बागांना बसण्याची शक्यता आहे. उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे फळं खराब होत आहेत. तापमानामुळे द्राक्ष लालसर पडत असून ते फेकून द्यावे लागत आहे.
रिसोड तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी संजय पवार यांनी मोठ्या मेहनतीने द्राक्ष बाग फुलवली आहे. काही दिवसात फळ तोडणी करून ते बाजारात विक्री केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाचा फटका प्रामुख्याने फळबागांना बसत असल्याचे दिसून येत आहे. यात द्राक्ष बागांचे देखील नुकसान होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.