---Advertisement---

पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला ; नाशिकमधील शिबिरातून देणार कार्यकर्त्यांना मंत्र

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पराभव पत्करावा लागला असून यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यभर कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून दौरे करणार होते. या दौऱ्यांना मुहूर्त लागत नव्हता. मात्र आता नाशिकला पहिला मेळावा आज होत आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या या शिवसेनेच्या निर्धार शिबिराला खास महत्त्व प्राप्त झाले असून नाशिकमधील 35 पैकी 20 माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे विधानसभेत आलेले अपयश व पक्षातील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आव्हान आहे.

सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. या स्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. महायुतीकडून त्यांना रोखण्यासाठी सर्व प्रकारचे राजकीय डावपेच आखले जात आहे. यामध्ये शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे.

या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या नाशिकच्या शिबिरात प्रामुख्याने शिवसेनेतच का राहावे यावर मंथन होणार आहे. त्यात ‘मी शिवसेनेतच का?’ यावर भर दिला जाणार आहे. शिबिरातील विषय पत्रिकेत तसे संकेत स्पष्ट आहेत. दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करावा करावा लागेल. आज नाशिकमध्ये होणाऱ्या शिबिराचे उद्घाटन युवा नेते आदित्य ठाकरे करतील. त्यानंतर विविध जुन्या नव्या कार्यकर्त्यांना आपली मते, आणि अडचणी मांडण्याची संधी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप होईल. हाच पॅटर्न सबंध राज्यभर होणाऱ्या शिबिरांमध्ये वापरला जाणार आहे.

शिवसेना ठाकरे पक्ष सध्या महायुतीच्या सत्तेच्या माध्यमातून होणाऱ्या अडवणूक आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक आणि अन्य प्रलोभनांद्वारे पदाधिकाऱ्यांना फोडण्याच्या आव्हानाला सामोरे जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---