नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सावखेड येथील दोन मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साई संदीप कुमावत व शुभम शांताराम गोरे (वय १२) असे घटनेत मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत मुलांच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.
शाळेला सुटी असल्याने गावात एकाच ठिकाणी राहणारे व नेहमी सोबत राहणारे साई कुमावत व शुभम मोरे हे दोघेजण सकाळी अंघोळ करण्यासाठी जवळच असलेल्या शेततळ्यावर गेले होते. शेततळ्यातील पाण्यात उडी मारली मात्र ते दोघेही बाहेर येऊ शकले नाही.
दरम्यान घटनेची माहिती गावात समजल्यानंतर गावकरी शेततळ्याच्या दिशेने धावत गेले. यानंतर गावातील पोहणार्यांनी शेततळ्यात उतरून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. मुलांचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेची पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. घटनेने गावात शोककळा पसरली.
दरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला उपजिल्हा रुग्णालयात या मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले. तसेच मतदार संघातील शेततळ्यांमध्ये पुन्हा अशा घटना होऊ नये; यासाठी शेततळ्यांना संरक्षक जाळी बसविण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.