नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. भाउबंदकीच्या वादातून निर्माण झालेल्या तीव्र संघर्षात दोन गटांमध्ये कोयता आणि कुऱ्हाडींचा वापर करून हल्ला करण्यात आला, ज्यामुळे एक व्यक्तीचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर पंचनामा करत त्यांनी तातडीने जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे. हे हत्याकांड भाउबंदकीच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. पण कोयता आणि कुऱ्हाडीचा वापर करत झालेल्या रक्तरंजित हल्ल्यामुळे दातली गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.