नाशिक लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । लवकरच होळीचा सण आहे. त्यामुळे होळीच्या निमित्ताने चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. बहुतांश लोक रेल्वेने जातात, ज्यामुळे सर्व गाड्या तुडूंब भरून वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं मुंबई ते बनारस, एलटीटी दानापूर, मुंबई ते महू अशा तीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्यांना नाशिक रेल्वे स्थानकांवर थांबा असेल.
सीएसएमटी-बनारस-सीएसएमटी विशेष (२ फेऱ्या):
ट्रेन क्रमांक ०१०१३ ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १३ मार्च २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी ०५:३० वाजता बनारस येथे पोहोचेल.
परतीचा प्रवास, ट्रेन क्रमांक ०१०१४, १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता बनारस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
सीएसएमटी-मऊ-सीएसएमटी विशेष (२ फेऱ्या):
ट्रेन क्रमांक ०१०१५ १२ मार्च २०२५ रोजी रात्री १२:३० वाजता सीएसएमटीहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १०:३० वाजता मऊ येथे पोहोचेल.
परत जाणारी ट्रेन क्रमांक ०१०१६ ही १४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मऊ येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ००:४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
एलटीटी-दानापूर-एलटीटी विशेष (२ फेऱ्या):
ट्रेन क्रमांक ०१०११ ही लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून १० मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६:४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल.
परतीची ट्रेन, क्रमांक ०१०१२, ११ मार्च २०२५ रोजी २१:३० वाजता दानापूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ०४:५० वाजता एलटीटीला पोहोचेल.