---Advertisement---

मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी निघाला, पण रस्त्यातच घडलं नको ते

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सोमठाणे परिसरात हळदीच्या कार्यक्रमावरून घरी परतणाऱ्या मित्राच्या मोटरसायकलला अपघात झाला. यात थेट खोल विहिरीत पडला. विहिरीत पाणी असल्याने त्याला बाहेर निघत न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सतीश रामकृष्ण जाधव असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सतीश जाधव याच्या मित्राचे आज लग्न होते. तर मंगळवारी (६ मे) हळदीचा कार्यक्रम असल्याने सतीश हा मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी सोमठाणे येथे गेला होता. हळद लागल्यानंतर नाचला यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला होता. हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना एरंडगाव- सातारे रस्त्यावर अंधारामुळे वळण रस्ता लक्षात आला नाही. यामुळे दुचाकीसह तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कठड्याला मोटर सायकलची धडक बसली. यानंतर मोटरसायकल स्वार विहिरीच्या पाण्यात पडला. यावेळी विहिरीत पाणी अधिक होते व त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान रात्री रस्त्यावरून रहदारी नसल्याने घडलेल्या घटनेबाबत कोणालाही माहिती मिळाली नाही. तर आज ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवला आहे. दरम्यान घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---