---Advertisement---

.. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार? आजचं हे महत्वाचं काम करा

ration card
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड दिले असून यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. देशातील कोट्यवधी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहे. मात्र रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर केवायसी केले नसेल तर आजच करुन घ्या. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.

केंद्र सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी (KYC) करणे अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारने अंतिम मुदत आधीच दिली होती.रेशन कार्डचे ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. जर असे केले नाही तर रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. ज्यामुळे मोफत रेशन सुविधा उपलब्ध होणे बंद होऊ शकते.

ई-केवायसी करण्याची प्रोसेस
रेशन कार्डधारक फक्त आजपर्यंतच ई केवायसी करु शकतात. त्यासाठी तुम्हाला जवळच्या रेशन कार्ड दुकानात जावे लागेल. रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही बायोमॅट्रिक करु शकतात. बायोमॅट्रिक करुन तुम्ही केवायसी पूर्ण करु शकतात. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड सोबत घेऊन जायचे आहे.

रेशन कार्ड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नारंगी, पांढरे असे रेशन कार्ड असतात. हे रेशन कार्ड नागरिकांच्या उत्पन्नानुसार त्यांना दिले जातात. त्यानुसारच त्यांना मोफत अन्नधान्य दिले जाते. त्यांचे उत्पन्न जर जास्त असेल तर त्यांना मोफत रेशन कार्ड मिळत नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---