नाशिक लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । सर्वाधिक उष्ण महिना समजले जाणाऱ्या मे महिन्यात महाराष्ट्रात पावसाळ्यासारखे पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात मागच्या पाच सहा दिवासापासून वादळी पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा कायम असून आज देखील जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस होणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये बुधवारी दिवसभरात १० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, सिन्नरमध्येही पाऊस झाला. ओझरमध्ये एका शेळीसह ८ मेंढ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घसरण झाली. विशेष मे महिन्यात नाशिकमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशावर जाते. परंतु यंदा अवकाळीचा सावटामुळे तापमानात चाळीशीच्या खालीच आहे. बुधवारी नाशिकचे तापमान ३२.५ अंशांवर होते.
दरम्यान सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकमध्ये अवकाळीची स्थिती कायम असून आज हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यात मुसळधार वादळी पावसाचा इशारा दिला असून त्याच पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.