---Advertisement---

राज्यात अवकाळीचं संकट कायम! आज नाशिकसह आठ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । नाशिकसह राज्यातील काही ठिकाणी मंगळवारी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले. दरम्यान हवामान खात्याने आज आठ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांना गारपाटीची शक्यता?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकसहसह, जळगाव पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबत गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळं या भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकणातील मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, नंदूरबार, सांगली, सोलापूर या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळे मोठं नुकसान ?
दरम्यान मंगळवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सुरगाणा, चांदवड, कळवण, त्र्यंबकेश्वर, सटाणा, येवला, पेठ, कळवण, निफाड, मनमाड , मालेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला, या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---