नाशिक लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । सध्या महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आहे. 1 एप्रिल रोजी राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान आज नाशिकसह १० जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई वेधशाळेनं आज नाशिकसह जळगाव, छ. संभाजीनगर जालना, अहिल्यानगर, पुणे सातारा, बीड, आमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तविली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे
दरम्यान सध्या ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी (दि. १) दिवसभर उष्ण व दमट वातावरण असल्याने उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. २ दिवसांत किमान तापमानात ५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन मंगळवारी ते २४.२ तर कमाल ३३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. काही ठिकाणी पावसाचे थेंबही पडले. आज जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तविली आहे.