---Advertisement---

मे महिना संपण्यावर आला, तरी नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदी होईना, शेतकरी संकटात

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. त्यातच नाफेड आणि NCCF कडून शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येत असलेला कांदा मे महिना संपण्यावर आला तरी अद्यापही कांदा खरेदीला मुहूर्त सापडत नाहीय. या सर्व प्रकारामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

एरवी एप्रिल महिन्याच्या शेवटी कांदा काढणीला सुरवात झाली होती. तेव्हा पासून कांदा खरेदी सुरु होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप खरेदीला सुरवात झालेली नसल्याने नाफेड आणि NCCF च्या भोंगळ कारभाराचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला चांगला भाव मिळावा; यासाठी नाफेड व एनसीसीएस कडून कांदा खरेदी करण्यात येत असतो. मात्र यंदाच्या वर्षातील कांदा खरेदी अद्याप सुरु करण्यात आली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. एकीकडे कांद्याच्या भावात झालेली घसरण तर दुसरीकडे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा खराब होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे लवकरात लवकर कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

यंदा नाफेड आणि NCCF कडून ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्टं ठेवण्यात आले आहे. यात एकट्या नाशिक जिल्ह्यात केली जाणार आहे प्रत्येकी १ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदीचे उद्दिष्ट आहे. या १ लाख मेट्रिक टन कांद्यापैकी NCCF कडून एप्रिल महिन्यात १० टक्के, मे महिन्यात ४५ टक्के तर जून महिन्यात उर्वरित ४५ टक्के कांदा खरेदीचं उद्दिष्टं आहे. त्या अनुषंगाने २८ एप्रिलला निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रिया संपून देखील अद्याप कांदा खरेदीला सुरुवात झालेली नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---