---Advertisement---

मनमाडमध्ये कांदा व्यापाऱ्याची लाखो रुपयात फसवणूक ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । नाशिकच्या मनमाडमधील बाजार समितीमध्ये एका कांदा व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच जणांनी कांदा खरेदी करत तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चांदवडमध्ये एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

मनमाड बाजार समितीत कांद्याचा व्यापार करणाऱ्या शहरातील गणेश अहिरे या व्यापाऱ्याकडून विदर्भ व सोलापूर जिल्ह्यातील कांदा खरेदी केला. सदरचा व्यवहार २०२१ ते २०२२ या कालावधीत घडला होता. या व्यापाऱ्याकडून गौरव अहुजा, साजिद शेख, खालीद शेख, सुखदेव राऊत, सुनील अडत कंपनी, मंदार अडसूळ आदींनी २०२१ ते २०२२ या कालावधीत कांदा खरेदी केला. परंतु रक्कम न देता नंतर देतो असे सांगत आजतागायत त्याचा मोबदला दिला नाही. मात्र बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील रक्कम मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत गणेश अहिरे यांनी मनमाड पोलिस स्थानकात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात संगनमताने फसवणूक प्रकरणी विविध कलमाद्रवारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.

द्राक्ष उत्पादकांची दोन लाखाची फसवणूक
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षांची काही व्यापाऱ्यांनी बागेची खरेदी केली. प्रत्येक शेतकऱ्याचे ठराविक रकमेनुसार द्राक्षांची खरेदी केली. एकुण दोन लाख रुपयांची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. मात्र अनेक दिवस उलटून ही वारंवार संपर्क करुन देखील खरेदीदारांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच द्राक्ष उत्पादकांनी वडनेर- भैरव पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोघां विरोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---