नाशिक लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून कांदा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मनमाड बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सोमवारी मनमाड बाजार समितीत उन्हाळ कांद्याची २५७ वाहनातून आवक झाली. भाव ८०० ते १६०१ सरासरी १३०० रुपये क्विंटल होते. मागील आठवड्यात १०५० ते ११०० रुपये क्विंटल होते. मागील ३ ते ४ दिवसापासून कांद्याच्या भावात सरासरी क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाल्यामुळे कांदा उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मे महिन्यात कांद्याला सरासरी १००० ते ११०० रुपये भाव होता.
आता सरासरी भाव १३०० रुपयांवर पोहोचला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कांदा अल्पदराने विकला जात असल्याने शेतकरी नाराज होते. पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासह चाळीत साठवलेला कांदाही खराब होत आहे. जागतिक पातळीवर कांद्याचा तुटवडा होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. तुटवडा जाणवल्यास कांद्याचे दर वाढून शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे येत ग्रामीण अर्थव्यवस्थेला