---Advertisement---

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! Fastag बाबत आजपासून नवीन नियम

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी असून Fastag बाबत आजपासून नवीन नियम लागू झाला आहे. जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)ने हा निर्णय घेतला आहे.

आजपासून तुमच्या वाहनांना फास्टॅग असणे अनिवार्य आहे. याचसोबत घराबाहेर पडताना तुम्ही फास्टॅग रिचार्ज नक्की करा. ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. यामुळे तुम्हाला टोल भरण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही.

भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या निर्देषानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नेहमी कार घेऊन जाताना आधी फास्टॅग रिचार्ज केला की नाही हे चेक करा.

या टोलनाक्यांवर भरावा लागणार दुप्पट टोल
जर तुम्ही कॅश, ऑनलाइन पेमेंट किंवा कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
राजीव गांधी वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील एन्ट्री पॉइंटवरील ५ टोलनाके, समृद्धी महामार्गावरील २३ टोलनाके, नागपुरात ५, सोलापुरात ४, संभाजीनगरमध्ये ३ टोलनाके आहेत जिथे दुप्पट टोल आकारला जाणार आहे.

मुंबईतील दहीसर टोल नाका, मुलुंड पश्चिम टोल नाका, मुलुंड पूर्व टोल नाका, ऐरोली टोल नाका, वाशी टोल प्लाझा या टोलनाक्यावर जर फास्टॅग नसेल तर डबल टोल भरावा लागणार आहे. यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे. तुम्ही ४७ सेकंदात टोल भरु शकणार आहे. यामुळे लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---