नाशिक लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । नाशिककरांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे नाशिक- मुंबई रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे लाईन उभारण्यात येणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ तब्बल एका तासाने वाचणार आहे. र आहे. नाशिक- मुंबई रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे लाईन उभारण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक -मुंबई रेल्वेमार्गावर समांतर रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारली जाणार आहे. साधारणपणे १४० किलोमीटरच्या मार्गावर समांतर रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. नवीन रेल्वेमार्गावर नवीन नाशिकरोड, नवीन पाडळी, वैतरणानगर, चिंचलखैरे ही चार नवीन स्थानके बांधली जाणार आहेत.
नाशिक-मुंबई नव्या रेल्वे लाईनवर १२ बोगदे असणार आहेत. कसारा घाटातील चढ कमी होणार असल्याने इंधनाची देखील बचत होणार आहे. त्याचसोबत विना बँकर इंजिन रेल्वे धावणार असल्यानं प्रवासाचा वेळ वाचणार आहे. महत्वाचे म्हणजे या प्रवासादरम्यान प्रवासाचा वेळ तब्बल १ तासांनी वाचणार आहे. या नव्या मार्गासाठी चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.