---Advertisement---

नाशिकच्या या तालुक्यात अवकाळीचा तडाखा ; शेती पिकांचे मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढला होता. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आली होती. यामुळे नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले होते. मात्र मागील दोन दिवसात राज्यात पुन्हा एकदा गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकाचे मोठं नुकसान झाले आहे. नाशिकमधील निफाड, चांदवड अन येवला तालुक्यालाही अवकाळीने फटका दिला. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

रविवारी (दि. 13) दुपारी 4 च्या सुमारास निफाड तालुक्यातील रानवड मंडळात जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली, तर चांदवड तालुक्यातील वडनेरला 6 च्या सुमारा अवकाळीने जोरदार पाऊस बरसला. येवला तालुक्यातील राजापूर, खिर्डी साठे परिसरालाही सायंकाळी 7 च्या दरम्यान पावसाने झोडपले. पीक नुकसानीबाबत ग्रामस्तरीय समितीला पाहणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. आगामी 48 तासांत जिल्ह्यात वादळीवार्‍यासह पावसाचा फटका बसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गत दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातून येणार्‍या गार वार्‍यांमुळे नाशिक शहरातील तापमानात घट झाल्यामुळे नाशिककरांना काही प्रमाणात उन्हापासून दिलासा मिळाला होता. मात्र गत 24 तासांत निफाड, चांदवड अन येवल्याला अवकाळीने झोपडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजापूरसह खिर्डीसाठे, पन्हाळसाठे परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास गारपीट झाली. या गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्यातील पाण्यावर उन्हाळ कांदा लागवड केलेली होती व तो कांदा काढून ठेवला होता तो झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या गारपीट आणि पावसामुळे शेतकरीवर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

तापमानात घट; उकाडा कायम
मागील 8 दिवसांत तापमानाने 41.3 डिग्री सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने उन्हाच्या झळांनी नाशिककर त्रस्त झाले होते. मात्र पश्चिम महाराष्ट्राला बसलेला अवकाळीचा तडाखा अन ढगाळ हवामान यामुळे गत दोन दिवसांपासून नाशिककडे वारे वाहू लागल्याने तापमानात घट होताना दिसत आहे. मात्र उकाडा कायम आहे. 42 अंशांपर्यंत गेलेला पारा घसरू लागल्याने तापमान 35 पर्यंत खाली आले आहे. शनिवारी (दि. 12) किमान तापमान 20 अंश, तर कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. रविवारी तापमानाने पुन्हा 38 अंशांपर्यंत उसळी घेतली असली, तरी नाशिककडे येणार्‍या वार्‍यांमुळे नाशिककरांना उन्हाळा सुसह्य होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---