नाशिक लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । नाशिकमधील जिंदाल कंपनीमध्ये लागलेली आग ४८ तासांपासून धुमसतेय. अग्निशामन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण आग अजूनही आटोक्यात नाही. कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत आहे. आगीमुळे कंपनीतील सर्व माल जळला तर कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आग आटोक्यात आली नाही तर ६५०० कोटी रूपयांचे नुकसान होऊ शकते.
४८ तासांपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीच्या परिसरात असलेल्या गॅस टाकीला आग लागू नये यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. गॅस टाकीला आग लागून स्फोट झाल्यास पंधरा किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उध्वस्त. या गॅस टाकीचा ब्लास्ट होऊ नये म्हणून अग्निशमन दलाकडून या टाकीच्या परिसरात सातत्याने पाणी आणि फोम फवारणी केली जात आहे. गॅस टाकीचा स्फोट होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.