जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । देशभरात फसवणुकीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून विविध प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांना गंडविले जात आहे. याच दरम्यान, नाशिकच्या फळ व्यापाऱ्याला परदेशात द्राक्ष पाठवण्याकरिता कमिशन देण्याचे अमिष देत सोलापूर येथील फळ व्यापारी आणि कमिशन एजंटकडून ८६ लाख ६६ हजारांना गंडा घातल्याप्रकरणी सोलापूर येथील ४ व्यापारी व एजंटच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमीद रजा खान (रा. वडाळा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ ते २०२४ या कालावधीत सांगोला जिल्हा सोलापूर येथील प्रकाश वसंत वराडे, विकास वराडे, अक्षय जाधव, नवनाथ केनगर यांनी खान यांना परदेशात द्राक्ष पाठवतो असे सांगून अम्हाला द्राक्ष माल द्या, आम्ही तुम्हाला तुमचे कमिशन देऊ असे सांगून वेळोवेळी १ कोटी २३ लाख रुपये संशयितांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन स्वरुपात चौघांच्या बोलावण्यानुसार प्रकाश वराडे. नवनाथ केनगर या दोघांच्या नावे दिले. त्यातून कमिशन म्हणून ३६ लाख ८६ हजार रुपये परत दिले आहे.
मात्र काही दिवसांनी संशयितांनी कमिशन देणे बंद बंद केल्याने शंका आली. द्राक्ष खरेदीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत मागीतले असता संशयितांनी ५० लाख २५ लाख १७लाख १५ लाखांचे चार चेक दिले. ते स्वाक्षरी न जुळल्याने परत आले. वराडे याने विश्वास संपादन करत फसवणूक केल्याचे लक्षात येताच तक्रार दिली. उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे तपास करत आहे.