नाशिक लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । मे महिन्यात सर्वाधिक तापमानासाठी समजले जाते. या महिन्यात भाजून काढणारे ऊन पडते. मात्र यंदा मेच्या सुरुवातीपासूनच नाशिकसह राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात वादळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज दुपारी नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे येवला शहरात पत्र्याचा शेड कोसळला असून यात एकजण दबला गेल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची रोज हजेरी लागत आहे. जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या तालूक्यात पावसाची हजेरी लावत आहे. आज येवला शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरातील गंगादरवाजा बागात असलेल्या बँक ऑफ इंडिया समोर असलेले पत्र्याचे शेड कोसळले. त्याखाली दबून एक जण जखमी झाला आहे. रोज होत असलेल्या पावसामुळे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याने कांदा भिजत असल्याने नुकसान होण्याची भिती व्यक्त केली आहे.