---Advertisement---

नाशिक जिल्हा बँकेच्या मुख्य प्रशासकाचा अखेर राजीनामा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । थकीत कर्जवसुली मोहीम तीव्र होत असताना शासकीय पातळीवर घेतल्या गेलेल्या निर्णयानंतर नाराज असलेले जिल्हा बँकेचे मुख्य प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी अखेर राजीनामा दिला आहे. सहकार आयुक्तांना त्यांनी शुक्रवारी (दि.२) आपल्या पदाचा राजीनामा ईमेलद्वारे पाठविला. त्यांच्या जागी बाळासाहेब देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्तीची चर्चा आहे जिल्हा बँकेचे २२०० कोटींच्यावर थकीत कर्ज असून बँकेला आपली नवीन इमारत विक्री करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की आली आहे.

अशा काळात थकीत कर्जवसुली करण्यासाठी बैंक प्रशासनाने कडक धोरण अवलंबविले होते. आता चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने शासनासह बैंक प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. यावर्षी चव्हाण यांच्या कार्यकाळात २३५ कोटी रुपयांची वसुली झाली. तसेच बँकेत शिलकी वाढण्यासाठी ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के वेतन कपातीचा निर्णय घेतला होता. २२ फेब्रुवारी २०२३ पासून ते बँकेत प्रशासक म्हणून रूजू झाले होते. या संदर्भात चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

यामुळे चव्हाण यांचा राजीनाम्याचा निर्णय
तीन महिन्यांपर्यंत कर्ज वसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत मागील महिन्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. याशिवाय गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत थकीत कर्जावरील व्याजाच्या सवलतीसाठी ओटीएस योजना जाहीर केली होती. प्राप्त माहितीनुसार, या दोन निर्णयांमुळे मुख्य प्रशासक प्रतापसिंग चव्हाण नाराज होते. याच नाराजीनाट्यातून त्यांनी प्रशासकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---