---Advertisement---

नाशिक हादरले! टोळक्याकडून १७ वर्षीय तरुणाचा खून

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीय. याच दरम्यान एका टोळक्याने १७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून केल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या कॉलेज रोडलगत असलेल्या संत कबीरनगर परिसरात घडली. अरुण रामलू बंडी (रा. कामगारनगर) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा संशयितांना अटक केली. तर इतर तिघांचा शोध सुरू आहे.

‘तू आमच्या एरियात यायचं नाही आणि आम्हीही तुझ्या एरियात येणार नाही’ या वादातून टोळक्याने अरुणचा खून केल्याचा पोलिस तपासात उलगडा झाला आहे. शनिवारी दुपारी त्यांच्यात वाद झाल्यानंतर संशयितांनी अरुणचा शोध घेतला, पण तो न मिळाल्याने ते परतले. रात्री अरुण संत कबीरनगरमध्ये आल्याची माहिती मिळताच त्याला घेरून हल्ला केला आणि दुचाकीवरून पसार झाले.

या प्रकरणात सहा संशयितांचा सहभाग समोर आला असून तपासाच्या अनुषंगाने विलास काटे (१८) आणि ओम खंडागळे (१८, दोघे रा. संत कबीरनगर) या दोघांना अटक केली असून, एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. अन्य तिघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, गंगापूर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---