---Advertisement---

एप्रिल ते जूनपर्यंत देशातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार; हवामान खात्याकडून अंदाज जाहीर

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । यंदाचा उन्हाचा बाजून काढणारा निघणार आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी तीन महिन्याचा तापमानाबाबतचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार यंदा एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.

IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. साधारणत: एप्रिल ते जून या काळात भारतात चार ते सात दिवस उष्णतेची लाट असते.

तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता
बहुतांश भागात किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने यापूर्वी सांगितले होते की उत्तर-पश्चिम भारतात उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट होऊ शकते. या प्रदेशात उन्हाळी हंगामात साधारणपणे पाच ते सहा दिवस उष्णतेच्या लाटा राहतात.

‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज
ज्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट सामान्यपेक्षा जास्त दिवस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---