नाशिक लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसत असून अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली. यातच पुढील 36 तास अत्यंत महत्त्वाचे आहे.
कारण अरबी समुद्रात कमी दाबाचे तयार झालेले क्षेत्र आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्याचा वेग 35-40 किमी तर काही ठिकाणी तो वेग 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मेघगर्जनांसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 2-4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी भागात मच्छिमारांना न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे..
पुढील चार दिवसांचे अलर्ट काय?
संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे.रत्नागिरीत आज रेड अलर्ट असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. उद्या (23 मे)रोजी रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट असून पुणे, नगर, संभाजीनगर, नाशिक,ठाणे, पालघर, मुंबई सिंधूदुर्ग, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित भागात पावसाचा यलो अलर्ट आहे. शनिवार आणि रविवारी कोकण किनारपट्टी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट आहे.