---Advertisement---

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी ; नाशिकमध्ये कसं राहणार वातावरण?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । राज्यात सध्या कडक उन्हाळ्याचा तडाखा सुरू असतानाच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी आज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह नाशिक जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये तापमानात वाढ होत असून, नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अशातच राज्यात काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आला असून यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---