---Advertisement---

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले सहा महत्त्वाचे निर्णय ; वाचा कोणकोणते आहेत?

mantralay fadanvis
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । आज मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडली असून या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्याशिवाय जळगाव, पुणे यासह इतर जिल्ह्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

दरम्यान फडणवीस सरकारकडून आज वादळी निर्णय घेण्याची शक्यता होती, डान्स बारच्या कायद्यात बदल करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता होती, पण तसा कोणताही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला नाही.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  • जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
  • म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
  • सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
  • राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  • अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
  • पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---