---Advertisement---

तीन दिवसांच्या सुटीनंतर लासलगावचा बाजार सुरु, कांद्याला मिळतोय ‘एवढा’ भाव?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । लाल कांद्याबरोबर नवीन उन्हाळ कांदाही मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये दाखल होत आहे. परिणामी मागील काही दिवसापासून अवाक वाढल्याने कांदा दरात घसरण दिसून आले. आता तीन दिवसांच्या सुटीनंतर लासलगाव कृषी उत्पन बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाले असून, लाल कांद्याला सरासरी १,३७०, तर उन्हाळ कांद्याला १,४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

कांदा मागणी जास्त असली, तरी २० टक्के निर्यातशुल्कामुळे बाजारभाव घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. २० टक्के निर्यातशुल्कावर गेल्या सोमवारी राष्ट्रवादी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचप्रमाणे लोकसभेत खासदार भास्कर भगरे यांनीदेखील कांदाप्रश्नी आवाज उठवला होता.ॉ

सोमवारी (दि. १७) उन्हाळ आणि लाल कांदा सरासरी २,६०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाला, तोच कांदा बुधवारी (दि. १२) १,४०० रुपयांवर येऊन ठेपला. देशात साधारणपणे ३०० लाख टनांहून अधिक कांद्याचे उत्पादन होत असते. त्यापैकी सुमारे १०-१५ टक्के निर्यात होतो. निर्यात कमी असली, तरी देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात.

निर्यात उलाढालही रोडावली
सरकारी आकडेवारीनुसार, भारताने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ४,५२२ कोटी रुपयांचा २५.२५ लाख टन कांदा निर्यात केला, जो २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३,९२२ कोटी रुपयांना १७.१७ लाख टनांवर घसरला. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान देशाने २,६६३ कोटी रुपयांचा व्यवसाय करून ६.७३ लाख टन कांद्याची निर्यात केली आहे.

निर्यातबंदी उठविण्याची हीच वेळ
व्यापाऱ्यांनीही २० टक्के निर्यातशुल्क हटविणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. रमजान ईद जवळ येत असल्याने, मध्य पूर्वेकडून कांद्याची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी निर्बंध उठवण्याची ही योग्य वेळ आहे, असे नाशिकमधील निर्यातदार सांगत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---