---Advertisement---

पहलगाम हल्ल्यानंतर नाशिक शहरातील काश्मिरी नागरिक झाले गायब !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामुळे देशभरात संतापाची लाट पसरलीय. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यात केंद्र सरकारने व्हिसा घेऊन भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशात परतण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते परतले आहेत. आता देशातील काश्मिरी नागरिकांवरही भीतीचे सावट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नाशिकमधील काश्मिरी नागरिक अचानकपणे गायब झाल्याचे चित्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपर्यंत धार्मिक स्थळांजवळ, रस्त्यांवर फुले, खेळणी, शाली विक्री करणारे काश्मिरी नागरिक सहजपणे आढळून येत होते. मात्र, आता शहरात काश्मिरी नागरिक दिसेनासे झाले आहेत. हे सारे अचानक कुठे गायब झाले हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर काश्मिरी नागरिकांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ लागल्याची भावना आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर ओढावू शकते, आपण नागरिकांच्या रोषाचे शिकार होऊ नये, या भीतीने त्यांनी शहर सोडले असावे असा अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान अनेक काश्मिरी नागरिकांकडे ओळखीची पूर्ण कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तपासणी केल्यास काय होईल? या भीतीने त्यांनी शहर सोडलं असावं. शिवाय, सोशल मीडियावर काही ठराविक समाजाकडून खरेदी न करण्याचे संदेश फिरत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे बेरोजगारी वाढण्याच्या भीतीनेही त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान, या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी पोलिस आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे. संशयास्पद हालचालींवर पोलीस नजर ठेऊन आहेत. भाड्याच्या घरांची तपासणी, हॉटेल आणि लॉजमध्ये राहणाऱ्यांची नोंदणी काटेकोरपणे केली जाते. संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---