---Advertisement---

भारत-पाक युद्धबंदीनंतर शेअर बाजार एकदम सुसाट ; सेन्सेक्स, निफ्टी तब्बल ‘एवढ्या’ अंकांनी वधारला

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । भारत- पाक शस्त्रसंधीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर मार्केटमध्ये आज तेजी दिसून आल्यामुळे गुंतवणूकदारांची मात्र चांदी झाली आहे.

शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये मंदी होती. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज सोमवारी (दि.१२) सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २,२०० अंकांनी वाढून ८१,७०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६५० हून अधिक अंकांनी वाढून २४,७०० पार झाला. मुख्यतः मिडकॅप शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात, भारत- पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील व्यवहार एका मर्यादेत राहिला होता. पण दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीनंतर बाजारात बंपर तेजी आली. शस्त्रसंधीच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. दरम्यान, आज निफ्टी फार्मा निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी वाढ नोंदवली.

कोणते शेअर्स टॉप गेनर्स?
बीएसई सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स आणि ॲक्सिस बँक हे शेअर्स प्रत्येकी ४ टक्के वाढले आहेत. त्याचबरोबर इटर्नल, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एलटी, पॉवर ग्रिड, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँक हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर दुसरीकडे सन फार्माचा शेअर्स ४.७ टक्के घसरला. परदेशी गुंतवणूकदारांचा सलग १६ सत्रांत खरेदीवर जार राहिला. त्यानंतर ९ मे रोजी ते विक्रीकडे वळले. त्यांनी या दिवशी ३,७९९ कोटी रुपयांच्या देशांतर्गत शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ७,२७८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---