---Advertisement---

जय हिंद ! भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळ उडविले

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारताने पाकिस्तानवर हा हल्ला करत भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेतील फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले.  भारताची गुप्तचर यंत्रणा RAW ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय हवाई दलांनी केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या चार, लष्कर-ए-तोयबाच्या तीन आणि हिजबुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.दरम्यान या हल्ल्यात शेकडोहुन अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे .

या नऊ ठिकाणांवर केला हल्ला?
१. मरकझ सुभान अल्लाह बहवालपूर

२. मरकज तैयबा, मुरीदके

३. सरजल/ तेहरा कलान

४. मेहमूना जोया फॅसिलिटी, सियालकोट

५. मरकज अहले हदीथ बर्नाला, भिंबेर

६. मरकज अब्बास, कोटली

७. कोटली जिल्ह्यातील मस्कर रहील शाहिद

८. मुझफ्फराबादमधील शवाई नल्लाह कॅम

९. मरकज सयेदना बिलाल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---