---Advertisement---

मान्सून मुंबईत दाखल! IMD कडून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अलर्ट

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । यंदा मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात धडकला आहे. २५ मे रोजी कोकणात दाखल झालेला मान्सून आज २६ मे रोजी मुंबईत दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. मागील पाच दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने कहर केला आहे. मुंबईमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर रेल्वे रूळावर पाणी साचलेय. तर पुण्यामध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस पडला आहे. पुढील तीन दिवस आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवणयात आला आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक मध्ये देखील मागच्या काही दिवसात अवकाळीनंतर मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्यात सध्या सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आगामी पाच दिवसाचा नवीन अदांज जाहीर केला आहे.

Image

राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
रेड अलर्ट (अति मुसळधार पाऊस ≥ २०४.५ मिमी): मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे (घाट क्षेत्र), सातारा (घाट क्षेत्र)
ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अति मुसळधार पाऊस ११५.६–२०४.४ मिमी): सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे (शहरी भाग), कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव
यलो अलर्ट (मुसळधार पाऊस ६४.५–११५.५ मिमी): पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेडसह उर्वरित जिल्हे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---