नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात रिक्षामध्ये जात असताना झालेल्या वादामधून नवऱ्याने पत्नीसमोरच उड्डाणपुलावरून उडी घेत आयुष्य संपवले. तपोवन (Tapovan) परिसरातील कन्नमार पुलावर ही घटना घडली असून आत्महत्या (Succied) करणाऱ्या तरुणाचे नाव चेतक पवार असे आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान पोलिसांकडून चेतकच्या आत्महत्याच तपास करण्यात येत आहे. कौटुंबिक वाद हेच कारण आहे, की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस घेत आहे. पोलिसांनी आज चेतकची पत्नी आणि कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवले आहे. त्याशिवाय ज्या रिक्षातून चेतकने उडी घेतली, त्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलवलं आहे.
चेतक आणि त्याच्या पत्नी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणं सुरू होती. वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यावेळी चेतकने पत्नीला माघारी परत येण्यासाठी धमकी दिली होती. तू घरी परत आली नाही, तर आयुष्य संपवेल, अशी धमकी चेतकने दिली होती. पत्नी घरी परतल्यानंतरही चेतक याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस घेत आहेत.