---Advertisement---

नाशिकसह राज्यातील २७ महापालिकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा काय आहे

mantralay fadanvis
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२५ । नाशिकसह राज्यातील २७ महापालिकांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांचे मॅनहोल आणि गटार सफाईदरम्यान होणारे मृत्यू रोखण्यासाठी सरकारने या २७ महापालिकांसाठी १०० अत्याधुनिक रोबोट खरेदी करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. केरळ राज्यात रोबोटचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता.

आता केरळमदील यशस्वी प्रयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक ऑडिटमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला संरक्षण मिळू शकतेय.

मुंबई, ठाणेसह जास्त मोठ्या शहरांमध्ये मॅनहोलची सफाई करताना दुर्घटना घडतात, त्यामध्ये अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांचा जीव जातो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या महापालिकेत रोबोटद्वारे मॅनहोल सफाई होईल. राज्य सरकारने त्यासाठी १०० रोबेटची खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

सध्या देशभर अनेक शहरात सफाई कामगारांना प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये उतरवून सफाई केली जाते. सफाई करताना गटारातील गॅसमुळे अनेकांचा जीव गेलाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अशा कामांचे सामाजिक लेखापरीक्षण केले होते. सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची दखल घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरेही ओढले होते. त्यामुळे मॅनहोलच्या सफाईसाठी रोबोट खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्याला महाराष्ट्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. महाराष्ट्र सरकार मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या २७ महापालिकांसाठी १०० रोबोट खरेदी करणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---