नाशिक लाईव्ह न्यूज । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली आहे. असून त्यांच्या वक्तव्याचा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेतला आहे. कुंभमेळयात स्नान करणे, ही अंधश्रद्धा नाही, ही आपली धार्मिक परंपरा आहे. नाशिकमध्ये गोदावरीचे पाणी स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली असून यावेळी उपस्थित मंत्री महाजन यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा कामांची पाहणी केली. यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली आहे. यावर विचारले असता मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळा स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, धार्मिक परंपरा आहे.
ही शेकडो वर्षांपासून चालत असलेली परंपरा आहे. याला धार्मिक महत्त्व आहे म्हणून येथे सर्व प्रदूषणच आहे, पाणीच दूषित आहे असे म्हणण्याचे कारण नाही. निश्चित काही अंशी पाणी दूषित होते. एकाच वेळी कोट्यवधी लोक आल्यानंतर तो प्रश्न उद्भवतो. नाशिकबाबतीत गोदावरीत दूषित पाणी येत आहे हे मान्य आहे. मात्र, ते येऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्यासाठी 1,200 कोटींचा एमएलटी प्लांट उभारत आहोत. गोदावरीचे पाणी शुद्ध करण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. कुंभमेळ्याच्या शाही स्नानात एक डुबकी मारणे ही सर्वांची श्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. बाळा नांदगावकर देखील एका छोट्याश्या कमंडलूमधून पाणी घेऊन आले मी म्हटलं हड… मी पाणी पिणार नाही.’