---Advertisement---

राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; 1 एप्रिलपासून वीज दरात कपात होणार

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । सध्या उन्हाळा सुरु असून वाढत्या उन्हामुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. वीज वापर वाढल्याने वीज बिल सुद्धा भरमसाठ येत आहे. मात्र वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त असलेल्या राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महावितरण कंपनीने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले.

आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होंती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---