नाशिक लाईव्ह न्यूज । तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा. लक्ष्यात असू अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. Bombay High Court Bharti
आवश्यक पात्रता?
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यामध्ये कायद्याची पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, उमेदवारांकडे GCC-TBC प्रमाणपत्र किंवा ITI असणे आवश्यक आहे आणि इंग्रजी टायपिंगचा वेग प्रति मिनिट 40 शब्द असावा. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेतून पात्रता संबंधित इतर तपशील तपशीलवार तपासू शकतात.
वयोमर्यादा : किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पगार किती?
लिपिक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 29,200 ते 92,300 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
अर्ज शुल्क किती?
उमेदवारांना अर्ज करताना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 400 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया कशी होणार?
उमेदवारांची निवड स्क्रीनिंग, टायपिंग टेस्ट, मुलाखत इत्यादी टप्प्यांद्वारे केली जाईल. स्क्रीनिंग टेस्ट ९० गुणांची, टायपिंग टेस्ट 20 गुणांची आणि मुलाखत 40 गुणांची असेल.