---Advertisement---

आजपासून नाशिकमार्गे अमृत भारत एक्स्प्रेस सुरू, कुठून कुठपर्यंत धावणार?

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । नाशिकमार्गे मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सहरसा दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस सुरू केलीय. आज २ मे पासून या गाडीचा शुभारंभ झाला. विशेष या गाडीला नाशिकला थांबा असल्याने नाशिककर प्रवाशांची सोय झाली आहे.

११०१५ क्रमांकाची गाडी एलटीटी येथून दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी २ वाजता सहरसा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ११०१६ क्रमांकाची गाडी सहरसा येथून दर रविवारी पहाटे ४.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा :
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपुर जंक्शन, मुजफ्फरपूर, समस्तीपुर, हसनपूर रोड आणि खगडिया जंक्शन येथे थांबे मंजूर आहेत. या गाडीला ८ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, १ पेंट्री कार आणि दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---