---Advertisement---

शेतकऱ्यांबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान; काय म्हणाले वाचलंत का?

manikrao kokate
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. मात्र यातच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नवीन चर्चेला तोंड दिलं आहे.

पावसामुळं झालेल्या नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं संतप्त विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर शेतकरी संघटनांनी आणि विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. “शेतकरी संकटात असताना अशा प्रकारची टीका असंवेदनशील आहे,” अशी टीका केली आहे.

कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्या दरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. शेतकरी यावर्षी अवकाळी पावसाने होरपळले आहेत. कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळी कोकाटेंचं हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहे.

पत्रकारांनी विचारले असता की, उभ्या पिकांचे पंचनामे होत आहेत पण काढणी झालेल्या पिकांचं काय? यावर उत्तर देताना कोकाटे म्हणाले, “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---