---Advertisement---

मनमाड परिसरात शेतीच्या कामांना आला वेग ; बि-बियाणे व खते खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळाले. यातच मान्सूनने राज्यात जोरदार एंट्री घेत काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. संध्या पावसाने विश्रांती घेतल्याने आता शेतकरी शेती मशागतीत गुंतला आहे. शेतकरी शेतात नांगरणी, वखरणीनंतर शेतजमीन पेरणी योग्य करून ठेवत आहे.

यंदा पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. दरम्यान मे महिन्याच्या सुरुवाती पासूनच उन्हाचा जोर आणखी तीव्र झाला. रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कामाला लागला आहे. खरीप हंगामातील पेरणीपूर्व शेतीची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी उरकून घेत आहेत. पूर्वी जमिनीची मशागत बैल जोडीने केली जात होती. त्यामुळे शिवारामध्ये या महिन्यांमध्ये बैलाच्या गळ्यातील गोधर-घाटीचा मंजुळ आवाज ऐकावयास मिळत होता. परंतू बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागली आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी झालेली दिसून येते. अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी दिसते. जरी विज्ञान युगामध्ये अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केली जात असली, तरी ठराविक कामे बैलांच्या साह्याने केली जातात. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे जमिनीची मशागत ट्रॅक्टरने करताना दिसून येत आहेत. डिझेलचे भाव वाढल्यामुळे जमीन नांगरणीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षापर्यंत ट्रॅक्टरने मशागतीचा भाव एकरी एक हजार होता. त्यात वाढ होऊन दोन हजारापर्यंत गेला आहे.

बि-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी दुकांनामध्ये गर्दी
मे महिन्यात सलग २५ दिवस बेमोसमीव अवकाळी पावसाचा तडाखा ग्रामीण भागात बसला. पहिल्या पावसानंतर म्हणजे १५ ते २० जूननंतर जी कामे होतात ती कामे मी अखेर वजूनच्या प्रारंभीच सुरू झालेली दिसत आहेत. शेतकरी मशागतीच्या कामात व्यग्र झाला असून यावेळी पेरण्याही २० दिवस आधीच करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी बाजारात बि-बियाणे व खते यांच्या दुकांनामध्येही गर्दी आढळून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---