---Advertisement---

Nashik : शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! कृषी बाजार समिती ‘या’ वेळेत राहणार बंद? संचालकांचा निर्णय

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात, मात्र रात्री ११ वाजेनंतर काही गुंड प्रवृत्तीचे टोळके मद्यपान करून बाजार समितीत शेतकरी तसेच व्यापारी वर्गाला विनाकारण त्रास देणे, पैसे हिसकावून घेण्याचे प्रकार वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात बाजार घटकांच्या कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्केट यार्डवर कायदा व सुरक्षा व्यवस्था अबाधित राहील व बाजार घटकांना भीतीमुक्त व्यवहार करता यावे यासाठी बाजार समिती संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दैनंदिन रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील याबाबत बाजार समिती आवारात तसे फलकही लावण्यात आले आहेत.

दरम्यान, तब्बल ५ दिवसांच्या सुट्टीनंतर लासलगाव बाजारसमितीत आजपासून कांदा लिलाव सुरू झाला आहे. मात्र कांदा दरात घसरण झाली असून यामुळे आज कांद्याला कमीत कमी ७००, जास्तीत जास्त १६०२ तर सरासरी १२५० रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---