---Advertisement---

नाशिक जिल्ह्यातील 40 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून घरातच; खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी

soya
---Advertisement---

नाशिक जळगाव लाईव्ह न्यूज । कांदा आणि द्राक्षाचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सोयाबीनचीदेखील विक्रमी लागवड झाली. त्यामुळे जिल्ह्यात तीन नंबरचे पीक सोयाबीन झाले. मात्र सुरुवातीला बारदान नाही म्हणून सोयाबीनची खरेदी रखडल्यानंतर शासनाने मुदत वाढवून दिली, तरीही अजून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होऊ शकली नाही. सोयाबीन खरेदीसाठी गुरुवारी (दि. ६) रात्री बारा वाजेपर्यंत मुदत होती. मात्र, मात्र, जिल्ह्यातील सातही खरेदी केंद्रांवर शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत होते. बुधवारी (दि. ५) अखेर या सातही केंद्रांतून १२ हजार शेतकऱ्यांचे केवळ १६ हजार ६९७ क्विंटल सोयाबीन खरेदी झाले होते. नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ४० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून घरातच आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. शासनाने ४८९२ रूपयांचा हमीभाव दिला पण मुदतीत मात्र संपूर्ण सोयाबिन खरेदी केंद्रांपर्यंत पोहोचलेच नाही.

जिल्ह्यात खरिपात तब्बल १२७ टक्के म्हणजे एकूण उद्दिष्टापेक्षाही अधिक सोयाबीनची लागवड झाली. परंतु, नाशिकप्रमाणेच राज्यातील इतर जिल्ह्यांतही सोयाबीनची बंपर लागवड झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हताश झाला. जिल्ह्यात केंद्र सरकार अंगीकृत मार्केटिंग फेडरेशनमार्फत सिन्नर, येवला, लासलगाव, विंचूर, देवळा, मालेगाव, चांदवड येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. सात हजार रुपये इतका उत्पादन खर्च वाढल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हताश झाला. त्यांच्यापुढे पुन्हा एकदा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

यात खरीप पेरणीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आणि बाजारभावही पडले. यातून शेतकरी तारण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत खरेदी सुरू केली; जेणेकरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आधार होईल. मात्र, जिल्ह्यात अजूनही ३० टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी न केल्याने त्यांच्याकडे सोयाबीन पडूनच आहे. म्हणून खरेदीची मुदत वाढवून देण्यासाठी आता दबाव वाढला आहे.

जाचक अटी, ग्रेडरची मनमानी ठरली जाच
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी अनेक अडचणी आहेत. जाचक अटी, ग्रेडरची मनमानी, वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारणे यामुळे खरेदी केंद्रांवर अडचणी निर्माण झाल्या आहेत. हमीभावाने खरेदी करण्यात आलेले सोयाबीन राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तपासणी केल्यावर ग्रेडरकडून नापास करण्यात आल्याने चांदवड, सिन्नर तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले नसल्याचे वृत्त आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---